साावित्रीबाई फुले
जन्म : नायगाव-सातारा जिल्हा,
जानेवारी ३, इ.स. १८३१.
मृत्यू : पुणे, मार्च १०, इ.स. १८९७.
सावित्रीबाईंच्या आईचे
नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या
वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स.
१८४० साली जोतिराव फुल्यांशी
सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी
सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय
तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईचे सासरे
गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर,
परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची
जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन
राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले
हे आडनाव मिळाले. सावित्रीबाईंचे पती
जोतिराव फुले यांना लहानपणापासूनच
मातृप्रेम लाभले नाही.त्यांची मावस बहीण
सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला
होता. सगुणाआऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या
मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना
इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी
आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना
प्रेरित करण्यासाठी केला.
जोतिरावही शिक्षणाकडे
आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन
मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक
त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून
जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी
स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले.
सगुणाआऊ तर सोबत होत्याच दोघींनी
रीतसर शिक्षण घेतले.
१ मे, इ.स. १८४७ रोजी
सावित्रीबाईंनी सगुणाआऊला मागासांच्या
वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची
पहिली शाळा.सगुणाऊ तेथे आनंदाने व
उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली
शाळा मध्येच बंद पडली. १ जानेवारी, इ.स.
१८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि
सवित्रीबाईंनी मुलींची शाळा
काढली. सगुणाआऊंना त्या शाळेत
बोलाविण्यात आले. तत्कालीन ब्रिटिश
भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही
पहिलीच मुलींची शाळा ठरली.(यापूर्वी
मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या
१४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या.)
या शाळेत सावित्रीबाई
मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू
लागल्या.त्या काळात पुण्यातील अन्य
भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू
केल्या व काही काळ चालवल्या. सुरुवातीला
शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल
संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन
पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत
सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला....
जग बुडणार....कली आला...." असे सांगून
केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण
फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात
टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा
शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला.
घर सोडावे लागले. सगुणाआऊ सोडून गेली.
अनेक आघात होऊनही
सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. शिक्षणाच्या
प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही
काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा
आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे
सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही
त्यांनी आळा घातला. बाल-जरठ
विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-
तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण
समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य
नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना
सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन
करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार
नसलेल्या या विधवा मग
कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर
विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला
येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच
मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा
आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.
जोतिरावांनी या समस्येवर
उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू
केले सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले.
फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या
विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व
अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले
मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या
ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले.
त्याचे नाव यशवंत ठेवले.केशवपन बंद
करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे
प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे,
पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न
करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी
कल्पकतेने पार पडली.
सत्यशोधक समाजाच्या
कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे.
महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स.
१८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक
समाजाच्या कार्याची धुरा वाहिली.
आपल्या विचारांचा प्रसार
त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून
केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध
रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले.
पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित
करण्यात आली. इ.स. १८९६ सालातल्या
दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला
सत्कार्याचा आदर्श घालून दिला.पोटासाठी
शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना
दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना
सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले.
त्यांच्या कार्याला हातभार
म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार
अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला. इ.स.
१८९६-९७ सालांदरम्यान पुणे व परिसरात
प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा
जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला.
हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर
ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य
रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा
खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे
हाल ओळखून
सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ
वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना
सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या
कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या.प्लेगच्या
रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही
प्लेग झाला. त्यातून मार्च १० , इ.स. १८९७
रोजी त्यांचे निधन झाले.
पुणे येथील हे शिक्षण कार्य
पाहून १८५२मध्ये ईस्ट इंडिया कंपनी
सरकारने फुले पतिपत्नींचा मेजर कॅन्डी
यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि
शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले.
त्यानंतरही. सावित्रीबाई फुल्यांनी
भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले
शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी
’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही
लिहिले आहेत. सावित्रीबाईंच्या सामजिक
कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून
३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा
“बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.
सावित्रीबाईची प्रकाशित पुस्तके काव्यफुले
(काव्यसंग्रह,१८५४) मातोश्री सावित्रीबाईंचे
भाषणे वगाणी (१८९१) हे आहेत.

जन्म : नायगाव-सातारा जिल्हा,
जानेवारी ३, इ.स. १८३१.
मृत्यू : पुणे, मार्च १०, इ.स. १८९७.
सावित्रीबाईंच्या आईचे
नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या
वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. इ.स.
१८४० साली जोतिराव फुल्यांशी
सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी
सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय
तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईचे सासरे
गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर,
परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची
जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन
राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले
हे आडनाव मिळाले. सावित्रीबाईंचे पती
जोतिराव फुले यांना लहानपणापासूनच
मातृप्रेम लाभले नाही.त्यांची मावस बहीण
सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला
होता. सगुणाआऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या
मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना
इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी
आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना
प्रेरित करण्यासाठी केला.
जोतिरावही शिक्षणाकडे
आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन
मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक
त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून
जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी
स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले.
सगुणाआऊ तर सोबत होत्याच दोघींनी
रीतसर शिक्षण घेतले.
१ मे, इ.स. १८४७ रोजी
सावित्रीबाईंनी सगुणाआऊला मागासांच्या
वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची
पहिली शाळा.सगुणाऊ तेथे आनंदाने व
उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली
शाळा मध्येच बंद पडली. १ जानेवारी, इ.स.
१८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि
सवित्रीबाईंनी मुलींची शाळा
काढली. सगुणाआऊंना त्या शाळेत
बोलाविण्यात आले. तत्कालीन ब्रिटिश
भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही
पहिलीच मुलींची शाळा ठरली.(यापूर्वी
मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या
१४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या.)
या शाळेत सावित्रीबाई
मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू
लागल्या.त्या काळात पुण्यातील अन्य
भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू
केल्या व काही काळ चालवल्या. सुरुवातीला
शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल
संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन
पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत
सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला....
जग बुडणार....कली आला...." असे सांगून
केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण
फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात
टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा
शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला.
घर सोडावे लागले. सगुणाआऊ सोडून गेली.
अनेक आघात होऊनही
सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. शिक्षणाच्या
प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही
काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा
आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे
सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही
त्यांनी आळा घातला. बाल-जरठ
विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-
तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण
समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य
नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना
सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन
करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार
नसलेल्या या विधवा मग
कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर
विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला
येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच
मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा
आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.
जोतिरावांनी या समस्येवर
उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू
केले सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले.
फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या
विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व
अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले
मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या
ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले.
त्याचे नाव यशवंत ठेवले.केशवपन बंद
करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे
प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे,
पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न
करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी
कल्पकतेने पार पडली.
सत्यशोधक समाजाच्या
कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे.
महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स.
१८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक
समाजाच्या कार्याची धुरा वाहिली.
आपल्या विचारांचा प्रसार
त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून
केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध
रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले.
पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित
करण्यात आली. इ.स. १८९६ सालातल्या
दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला
सत्कार्याचा आदर्श घालून दिला.पोटासाठी
शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना
दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना
सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले.
त्यांच्या कार्याला हातभार
म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार
अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला. इ.स.
१८९६-९७ सालांदरम्यान पुणे व परिसरात
प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा
जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला.
हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर
ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य
रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा
खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे
हाल ओळखून
सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ
वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना
सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या
कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या.प्लेगच्या
रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही
प्लेग झाला. त्यातून मार्च १० , इ.स. १८९७
रोजी त्यांचे निधन झाले.
पुणे येथील हे शिक्षण कार्य
पाहून १८५२मध्ये ईस्ट इंडिया कंपनी
सरकारने फुले पतिपत्नींचा मेजर कॅन्डी
यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि
शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले.
त्यानंतरही. सावित्रीबाई फुल्यांनी
भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले
शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी
’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही
लिहिले आहेत. सावित्रीबाईंच्या सामजिक
कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून
३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा
“बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.
सावित्रीबाईची प्रकाशित पुस्तके काव्यफुले
(काव्यसंग्रह,१८५४) मातोश्री सावित्रीबाईंचे
भाषणे वगाणी (१८९१) हे आहेत.